चिनी दूतावासाने मानले भारतीय नौदलाचे आभार   

नवी दिल्ली : केरळच्या किनारपट्टीनजीक सिंगापूरच्या मालवाहतूक जहाजाला लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे काम अद्याप सुरू आहे. या आगीतून जहाजातील क्रूमध्ये २२ जण होते, त्यापैकी १४ चिनी नागरिक आहेत. सहा  तैवानचे नागरिक आहेत. भारतीय नौदल आणि मुंबई तटरक्षक दलाने या अगीतून चीनच्या नागरिकांना वाचविल्याबद्दल चीनच्या भारतातील चीनच्या दूतावासाने भारताच्या नौदल आणि तटरक्षक दलाचे आभार मानले आहे. 
 
याबाबत बोलताना चीनचे राजदूत यू जिंग यांनी समाज माध्यमावर लिहिले, की  भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. जखमी क्रू सदस्य लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो असे त्यांनी सांगितले. 
 
या आगीनंतर आता केरळ समुद्र किनार्‍यावर तेल गळतीचा इशारा जारी करण्यात आला आहे. सिंगापूरच्या जहाजाला भीषण आग लागल्यानंतर भारताच्या नॅशनल सेंटर फॉर ओसीन इंफोर्मेशन सर्व्हिस केंद्राने हा इशारा जारी केला आहे. जहाज अजूनही जळत आहे. नौदल आणि तटरक्षक दल आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.दरम्यान, भारतीय नौदलाच्या आयएनएस सूरतने या जहाजावरील १८ सदस्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे, तर ४ क्रू मेंबर्स अजूनही बेपत्ता आहेत.
 

Related Articles